माझे शिक्षक व संस्कार
| अक्षरभारती | Class 9 |
- प्रियंका चंद्रात्रे
पाठ सारांश
👉 लेखक गावची शाळा सोडून शिक्षणासाठी औंध ( जि. सातारा ) येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होते. त्यासाठी त्यांनी शाळेतील शिक्षकाची भेट घेत होते.
👉 श्री. हणमंतराव देशमुख - गावचेच रहिवासी , इंग्रजी तर्खडकरांचे भाषांतर शिकवले, स्काउट मास्तर, शाळेचे स्काउटपथक पक्क्या पायावर उभारले.
👉 श्री. कात्रे मास्तर - चौथीच्या वर्गात गणित शिकवले, अवघड विषय सोप्पा करून शिकवला, मास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने कधी कधी त्रास व्हायचा, लेखकाचे वडील मास्तरांकडे लाकडे फोडायला जायचे.
👉 श्री. गोळीवडेकर मास्तर - पाचवीत मराठी, इतिहास व भूगोल शिकवायचे, खरे शेतीतज्ञ शिक्षक, शाळेच्या बागा करण्यातच अर्ध लक्ष, लेखकाचा व मास्तरांचा जवळचा परिचय झाला कारण शाळेच्या बागा मुलांच्या मेहनतीने फुलल्या होत्या.
मास्तर मुलांवर प्रेम करायचे कारण - मुले वयानं लहान पण धडधाकड होती. कष्टाच्या कामाला कणखर. मुले बागेतल्या विहीरीचं पाणी दोन-दोन तास राहाटाने ओढून, बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना देत असे. जमीन कुदळ, टिकावाने खांदावयाची, त्याचे वाफे करायचे, बंध घालायचे अशी सगळी कष्टाची कामे करत असे.
👉 हेडमास्तर श्री. नाईक मास्तर - शिस्तीचे कडे भोक्ते होते त्यामुळे शाळेत दरारा होता, शाळेला चांगलीच शिस्त लावली होती, शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत असे त्यामुळे कोणीही उशिरा येत नसे.
लेखक औंधला शिकायला जाणार म्हणून योग्य असं मार्गदर्शन केलं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी याबाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश लेखक कधीच विसरू शकणार नाही.
👉 श्री. रायगावकर, देशपांडे मास्तर - या शिक्षकांनी लेखकाला संस्कार देऊन ऋणी केलं आहे हे स्पष्ट करणारे खालील प्रसंग :
१) कुस्ती : कुस्तीसारख्या खेळातसुद्धा जातपात मानली जात असे. लेखक निम्न ( कनिष्ट ) जातीचे होते त्यांच्यासाठी वेगळी तालीम होत असे. लेखकाने हंगामात कुस्त्या करून खोबरे, नारळ, रुपया व पटका सुद्धा मिळवले होते. एकदा लेखक बाहेरगावी कुस्त्यांचा फड पाहायला गेले होते. तेथे एका स्थूल मुलाला, ' याला जोड, याला जोड' म्हणून फिरवत होते. दोन राऊंड मारूनही त्याला कुणी जोड उभा राहील नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, ' शंकऱ्या उठतोस का? धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर ?'
लेखक 'हा हा 'म्हणत मैदानात गेले आणि लढत करण्याची तैयारी दर्शवली; पण लेखकाला कुणीतरी ओळखले आणि अडवले. लेखक नाराज होऊन मागे झाले. हा प्रसंग पाहून रायगावकरांनी लेखकाची समजूत घातली. ते म्हणाले, 'अरे, समाज अजून निद्रिस्त आहे. खेळात-मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे, हे अजून त्याला नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल, की सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळात-स्पर्धेत मानाने बोलावले जाईल.'
२) शिमगा - शिमग्याच्या धुळवडीला लेखकाच्या प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता; पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता, हे पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच लेखक समोर आले आणि मान खाली करून उभे राहिले, ते पाहून मास्तर म्हणाले , " अरे! आज धूलिवंदन! हे चालायचेच !" आणि निघून गेले.
मास्तर दुसऱ्या दिवशी लेखकाला म्हणाले, " शंकर! तू हे ध्यानात ठेव. जिथं प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो, तुम्ही अभ्यास करता त्या विदयेच्या मंदिरात तमाशा कसा उभा ..?
लेखक - शंकरराव खरात