व्यायामाचे महत्त्व
कवी - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
| अक्षरभारती | Class 9 |
- प्रियंका चंद्रात्रे
भावार्थ
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी मानवी जीवनातील व्यायामाचे महत्व या कवितेतून स्पष्ट केले आहे.
Visit our YouTube Channel : Chandratre's Edu Hub
व्यायाम आरोग्यदायी मित्र | हे ध्यानी ठेवावे सूत्र |
आळस वैरी मानिला सर्वत्र | सर्वतोपरी ||
व्यायाम हा आपल्याला निरोगी आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हा नियम आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण आळस हा आपल्या जीवनाचा शत्रू आहे, हे सगळ्यांनी मान्य केलेले आहे.
Read More : जी. आय. पी. रेल्वे | Class 9 |
व्यायामाविण सात्त्विक भोजन । तेहि मारी विकारी होऊन ।
व्यायामे होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ।।
निरोगी आयुष्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. पण आहारासोबत व्यायामही केला पाहिजे, नाहीतर अशा आहारामुळे विविध विकार \ आजार होऊ शकतात. योग्य आहारासोबत व्यायाम केल्यामुळे पोटातील जठराग्नि उत्तेजित होतो. त्यामुळे अन्नाचे पचन सहज होते.
Read More : आभाळातल्या पाऊलवाटा | Class 9 | भावार्थ |
व्यायामे जडत्व जाई दूरी। व्यायामे अंगी राहे तरतरी ।
रक्तव्यवस्था उत्तम शरीरी। वाढे विचारी सजीवपण ।।
रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केला नाहीतर शरीरातील जडत्व \ स्थूलपणा वाढत जातो. रोज व्यायाम केल्यामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते. व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्था सुरळीत होते. रक्तप्रवाह व्यवस्थित झाल्यामुळे रक्ताशी संबंधित आजार होत नाही आणि आपले आयुष्य वाढते.
Read More : तिफन | Class 9 | भावार्थ |
व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामे मानव होय दीर्घायु ।
व्यायामहीना पित्त, कफ, वायु । जर्जर करिती अत्यंत ।।
रोज व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू बळकट होतात. सशक्त स्नायूंमुळे माणूस आजारी पडत नाही आणि आयुष्य वाढते. आपण व्यायाम केला नाही तर, आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ ( शरीरातील तीन प्रमुख दोष आहेत, जे आरोग्य आणि शरीराची प्रकृती नियंत्रित करतात) यांचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागते आणि आपण आजारी पडतो.
Read More : योगी सर्वकाळ सुखदाता | Class 10 | भावार्थ |
व्यायामे वाढे प्रतिकार शक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति ।
व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ।।
व्यायामामुळे आपले शरीर मजबूत होऊन रोगप्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे आपले शरीर आजारांचा सामना करू शकते. त्याचबरोबर उत्तम प्रकृति असल्यामुळे आपण स्वावलंबी बनतो. कोणतेही काम करायचे असल्यास कोणावर अवलंबून न राहता सक्षमपणे पूर्ण करण्याची शक्ती येते. व्यायामामुळे शरीरात एक वेगळीच ऊर्जा येत असते. कोणत्याही कामामध्ये उत्साह राहतो.
.jpg)