Advertisement

01 March 2026

आभाळतल्या पाऊलवाटा | अक्षरभारती | Class ९ | पाठ सारांश |

 आभाळातल्या पाऊलवाटा

| अक्षरभारती | Class ९ |

                                                                                       
                                                                                    - प्रियंका चंद्रात्रे 

पाठ सारांश 

आभाळतल्या पाऊलवाटा | class 9 |



✍️ आभाळातल्या पाऊलवाटा हा पाठ 'आपली सृष्टि आपले धन' या पुस्तकातून घेतला आहे. या पाठात पक्ष्यांचे स्थलांतर व त्यामागील कारणे यांचा उल्लेख केला आहे. 

✍️ युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून बदक व इतर असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी भारतात येतात. 

 Visit our YouTube channel : Chandratre's Edu Hub

✍️ श्वेतबलाक जर्मनीतून येतात, तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून भारतात येतात. 

✍️ बलकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाड्मयात उल्लेख आढळतात. हंस पक्षीसुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत, अशी वर्णने प्राचीन वाड्मयात आहेत. 

✍️ युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात. अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवलेकरी अथवा सस्तन प्राण्यांप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले पाहिजेत. पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले, की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात.


✍️ पक्षांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्याची पद्धत : 
 
१ ) वाळे अडकवण्याची पद्धत -

एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात ॲल्यु‍मिनियम   चे बनवलेले खुणेचे वाळे अडकवून द्यायचे. या वाळ्यावर ज्या संशोधनसंस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणेचा क्रमांक असतो. कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्ष्याला, कुठे आणि केव्हा लावले यांची संस्थेकडे नोंद असते. केरळात वाळे लावलेले पारित पक्षी काबूल, अफगाणिस्तान , वायव्य पाकिस्तान या भागांत सापडले आहेत. केरळातलाच एक रानपरीट ब्रम्हदेशात सापडला आहे. 


२) आधुनिक पद्धती -

विमाने आणि रडारयंत्रणा 

✍️ हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो. 


✍️ अनेकदा दुष्काळ, महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळेनासे झाले, की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात.

✍️ अन्नाचे दुर्भिक्ष हीच स्थलांतरामागची  मूळ  प्रेरणा आहे. 












No comments:

Post a Comment

व्यायामाचे महत्त्व | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |

व्यायामाचे महत्त्व   कवी - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर  | अक्षरभारती | Class 9 |                                    ...