Advertisement

27 February 2026

Kulup | कुलूप | अक्षरभारती | Class 9 | Kulup lesson summery | पाठ सारांश |

कुलूप 


| अक्षरभारती | Class 9 | 

                                    - प्रियंका चंद्रात्रे 


पाठ सारांश 

✍️ लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर  यांच्या ' सुदाम्याचे पोहे ' या लेखसंग्रहातून हा पाठ घेतला आहे. पाठातील मुख्य पात्र बंडूनाना आहेत, ज्यांना कुलपे संग्रह करण्याचा छंद आहे. 

✍️ बंडूनानांनी आपला छंद पूर्ण करायचा म्हणून, घरात अनेक धातूंची, आकारांची , कळींची कुलुपे जमवून संग्रहालय बनवले आहे.

Visit our YouTube channel : Cahndratre's Edu Hub

✍️ घरात दुधाच्या कपाटापासून ते पैशांच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुलुपे लावलेली आहेत. घरावर डाका पडणार आहे असे कळल्यावर कोणी इतकी तयारी करत नसेल, एवढा बंदोबस्त बंडूनाना करत असे. बंदोबस्त करण्याचे कारण वस्तूंचे रक्षण व्हावे असे नसून, कुलपांचा संग्रह मित्रांना दिसावा असा आहे. या हव्यासामुळेच बंडूनानांनी काही कडयांस दोन-दोन व काही दारांस दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत. 


बंडूनानांचे व्यक्तिमत्व | कुलूप | Class ९ |


✍️बंडूनानांच्या या छंदामुळे अनेक विनोदमय आणि संकटमय प्रसंग आले ते पुढीलप्रमाणे :

१ ) धान्याच्या कोठीचे कुलूप 

एकदा धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली. कुलूप वेगळ्या पद्धतीचे  असल्यामुळे संपूर्ण बाजारात किल्ली मिळाली नाही. कुलूप लोहाराकडून काढणे हे बंडूनानांना मान्य नव्हते कारण पोटच्या मुलापेक्षाही प्रेमाने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळ होताना पाहणे हे त्यांच्यासाठी वेदनदायी होते. शिवाय बंडूनाना मानी स्वभावाचे, त्यांनी शेजाऱ्यांकडे कधी ओंजळभर धान्यही उसने मागितले नव्हते. पहिला दिवस घरातील सर्व मंडळींनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपासात काढला. दुसऱ्या दिवशी द्ववादशी होती, तोही दिवस धार्मिकपणाने उपासात काढला. शेवटी सर्व हकिगत कळताच लेखकाने स्वत: लोहारास घेऊन नानांच्या घरी गेले व ते कुलूप फोडले; पण त्यामुळे नानांना लेखकाचा इतका राग आला, की ते पंधरा दिवसापर्यंत नीटपणे बोलले नाही.


२) ' वसुधैव कुटूंबकम् ' वृत्तीचे कुलूप -  

बंडूनाना सर्व उपयोगातील किल्ल्या आपल्या जानव्यात अडकून ठेवत असे त्यामुळे त्या कधी  हरवत नसे. हरवायच्या त्या कुटुंबातील सदस्यांकडे दिलेल्या किल्या. धान्याच्या कोठीच्या कुलपाच्या प्रसंगामुळे नाना साधी बाजारातील कुलपे कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले. या कुलपांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत. त्यांची अशी ' वसुधैव कुटूंबकम् ' वृत्ती ( सगळे कुलपे एकाच किल्लीने उघडणे ) पाहून शेवटी नानांच्या जवळच्या एका विश्वासू नोकराने हजार पाचशेचे डबोले घेऊन पळाला. 

३) तिजोरीची विविध कुलपे

अ ) अक्षरी कुलूप :

तिजोरीला कोणते कुलूप लावायचे याचा बंडूनानांना फार दिवस प्रश्न पडला होता. प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावले; पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षरे जमावताना ती नीट दिसेना, म्हणून त्यांनी ती मोठया कष्टाने उजेडात आणून ठेवली. पण तेव्हापासून अक्षरे जुळवताना समोर उभ्या असलेल्या माणसास ती अक्षरे दिसू लागली. त्यामुळे ती कुलपेही निरुपयोगी होती. यापेक्षा अक्षरशत्रू  कुलपे ( अशी कुलपे, ज्यांना उघडण्यासाठी अक्षरे जुळवावी लागत नाहीत, ती फक्त साध्या किल्लीने उघडतात ) असे म्हणून नानांनी त्या कुलपाऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली. 

ब ) अक्षरशत्रू कुलूप : 

हे कुलूप नुसते दाबले की लागत असे. उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागे. एके दिवशी बंडूनाना लेखकाकडे येऊन म्हणाले " आमच्या आर्यभूमीच्या ( भारताच्या ) पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे. पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. अहो, आम्हाला सांधी मिळत नाही साधी! ती मिळाली तर आमच्याकडे शेकडो एडिसन झाले असते" देशाच्या अभिमानाचा या  उमाळ्याचा अर्थ विचारला असता नानांनी प्रथम आपली कोणत्याही प्रकारे स्तुती करणार नाही असे लेखकाकडून वचन घेतले. हे कुलूप नानांनी स्वत: लोहाराच्या मदतीने बनवून घेतले होते. मात्र थोड्याच दिवसात चोरी झाली, तेव्हा नानांचा संताप झाला व म्हणाले " आमच्याकडे चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात.!" ( चोर देशाची प्रगती किंवा कला पाहू शकत नाही व कलेचा आदर करू शकत नाही) 

क ) घंटेचे कुलूप : 

शेवटी नानांनी तिजोरिस घंटेचे कुलूप लावले व ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. या कुलपास किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागेल.

४ ) टोळीकडून घेतलेली कुलपे : 

गावात लोकांची एक टोळी आली. त्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या , कुलपे वगैरे बऱ्याच वस्तु विकण्यासाठी होत्या. त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडूनानानीच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून नवी कुलपे लावली. कर्मधर्मसंयोगाने  [ चांगली कृत्ये  (कर्म ) आणि योग्य समय (धर्म \ नशीब ) यांच्या योगायोगाने जुळून आलेला मिलाफ ] एक नाटकमंडळीही  याच सुमारास गावात आलेली होती. तिचा पहिला प्रयोग 'सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक ' त्याच दिवशी होता. बंडूनाना कुटूंबातील सर्व सदस्यांना घेऊन नाटकाला गेले. नाटक सकाळी पाच वाजता संपले. घरी येऊन पाहतात तो सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल चोरीस गेलेला! तपास केला असता कळाले की टोळीही पळाली होती. यावरून लक्षात आले की, या टोळीने नानांना सर्व कुलपे विकून स्वत:च्याच किल्ल्या लावून माल पळवला. सुदैवाने त्या रात्री बंडूनानांचे कुटुंब त्यांचे न ऐकता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेले होते, त्यामुळे तेवढे मात्र वाचले. 




कुलपांच्या हव्यासामुळे घडलेले प्रसंग | कुलूप | Class ९ |







No comments:

Post a Comment

व्यायामाचे महत्त्व | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |

व्यायामाचे महत्त्व   कवी - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर  | अक्षरभारती | Class 9 |                                    ...