Advertisement

Showing posts with label जी. आय. पी. रेल्वे | | अक्षरभारती | Class 9 | पाठ सारांश |. Show all posts
Showing posts with label जी. आय. पी. रेल्वे | | अक्षरभारती | Class 9 | पाठ सारांश |. Show all posts

03 March 2026

जी. आय. पी. रेल्वे | | अक्षरभारती | Class 9 | पाठ सारांश |


जी. आय. पी. रेल्वे

 | अक्षरभारती | Class 9 |

                            
                                                                                 - प्रियंका चंद्रात्रे 

पाठ सारांश 



जी. आय. पी. रेल्वे | Class 9 |


👉 या पाठाचे लेखक केशव सीताराम ठाकरे आहेत. सन १८५३ मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना वाटणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे लेखकाने सुंदर वर्णन केले आहे. 



जी. आय. पी. रेल्वे | Class 9 |




Visit our YouTube Channel : Chandratre's Edu Hub

👉 मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केला. मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेविड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेट जी यांचेही पाठबळ होते. 

👉 दिनांक १८ एप्रिल सन १८५३, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. 

👉 आगगाडीला पाना- फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून १० मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले होते. इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण फडकत आहे. 


👉 डब्यांत गादीच्या खुर्च्या, कोच यांवर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटजी जीजीभाई, नाना शंकरशेठ  आणि अनेक इतर नगरशेट जामानिमा ( पारंपारिक पोशाक ) घालून बसले होते. 

👉 पाच वाजेच्या मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप पोहोचली. 

👉 वाफेच्या गाडीत बसायची लोकांची हिम्मत होत नव्हती, म्हणून दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या- आणण्याची दवंडी पिटवण्यात आली. 

👉 वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे, असा लोकांचा समज होता. 


👉 एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. त्यांनी आपले अनुभव सांगितले पण लोकांच्या मनातील भीती जात नव्हती. 

 👉 प्रत्येक माणसास एक रुपया इनाम आणि मोफत प्रवास. 

👉 रुपयांचे इनाम आठ आणे झाले पुढे चार आणे झाले, शेवटी लोकांचा संयम सुटला आणि गर्दी वाढू लागली. इनामे बंद झाली आणि तिकिटे चालू केली गेली. 

👉 ठाणे- मुंबई बैलगाडीच्या प्रवासाला एक दिवस लागत असे, मात्र आगगाडीने सव्वा तासात पूर्ण होत होता. 

👉 खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे- रस्ता सन १८५८ च्या फेब्रुवारीत पूर्ण झाला. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान फक्त खडकी आणि तळेगाव ही दोनच स्टेशन होती. 


👉 बोरघाटाचे काम - घाटाचे काम चालू असताना मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास करताना पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की सगळ्या प्रवाश्यांना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या आणि बैलगाड्यांत बसवून घाटाखाली खोपोवलीला आणायचे. सगळे प्रवाशी खोपोवलीला आले की तेथे पुन्हा आगगाडीत बसून मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट-उतरणीची व्यवस्थेचा कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या व्यापाऱ्याने घेतले होते. घाट-उतरणीचे चार तास धरून, पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अठरा तासांचा होता. 








 

व्यायामाचे महत्त्व | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |

व्यायामाचे महत्त्व   कवी - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर  | अक्षरभारती | Class 9 |                                    ...